भारतीय प्रजासत्ताक दिन
भारताचे संविधान
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले
जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात
आले. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण
म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने
संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक
दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिवस: ऑगस्ट १५ व गांधी जयंती: ऑक्टोबर २). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ
मार्गावरून निघते.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/
क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय
राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली
जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात.
त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.
नवी दिल्ली येथे होणार्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व
राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल
फौजांची मानवंदना स्वीकारतात.
अनुक्रमणिका
४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी भारताच्या घटनाकारांच्या मसुदा समितीने कच्चा मसुदा
तयार केला, व त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी
सभागृहात मांडण्यात आला. २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस या मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली, व त्यानंतर तो २६ नोव्हेंबर १९४९
रोजी स्वीकारला गेला..
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून
राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम
सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले
प्राण अर्पण करणार्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर
पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात
प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच पंतप्रधान
ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात.
प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.
वर्ष
|
प्रमुख अतिथी
|
देश
|
१९५०
|
||
१९५१
|
–
|
|
१९५२
|
–
|
|
१९५३
|
–
|
|
१९५४
|
||
१९५५
|
||
१९५६
|
–
|
|
१९५७
|
–
|
|
१९५८
|
–
|
|
१९५९
|
–
|
|
१९६०
|
||
१९६१
|
||
१९६२
|
–
|
|
१९६३
|
||
१९६४
|
–
|
|
१९६५
|
||
१९६६
|
–
|
|
१९६७
|
–
|
|
१९६८
|
||
१९६९
|
||
१९७०
|
–
|
|
१९७१
|
||
१९७२
|
||
१९७३
|
||
१९७४
|
||
१९७५
|
||
१९७६
|
||
१९७७
|
||
१९७८
|
||
१९७९
|
||
१९८०
|
||
१९८१
|
||
१९८२
|
||
१९८३
|
||
१९८४
|
||
१९८५
|
||
१९८६
|
||
१९८७
|
||
१९८८
|
||
१९८९
|
||
१९९०
|
||
१९९१
|
||
१९९२
|
||
१९९३
|
||
१९९४
|
||
१९९५
|
||
१९९६
|
||
१९९७
|
||
१९९८
|
||
१९९९
|
||
२०००
|
||
२००१
|
||
२००२
|
||
२००३
|
||
२००४
|
||
२००५
|
||
२००६
|
||
२००७
|
||
२००८
|
||
२००९
|
||
२०१०
|
||
२०११
|
||
२०१२
|
||
२०१५
|
||
२०१६
|
||
२०१७
|
No comments:
Post a Comment